सोलापुर : गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. अशातच सध्या शरद पवार गटात असलेले अभिजित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष करून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील बॅंकेने जप्तीची कारवाई केल्यानंतरही ही घडामोड घडली आहे. त्यामुळे अभिजीत पाटील भाजपात प्रवेश करणार का ? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. त्यावर आता अभिजित पाटील यांनी भाष्य केलं आहे.
अभिजित पाटील म्हणाले की, भाजपात जाण्यासंदर्भात आज कोणतीही चर्चा झाली नाही. विठ्ठल सहकारी कारखाना सध्या सील करण्यात आलाय. त्यासंदर्भात सरकारने मदत करावी, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाली. कारखान्यावर २०२१ मध्ये जप्तीची कारवाई झाली होती. त्यानंतरहे प्रकरण न्यायालयात सुरू होतं. मात्र या प्रकरणाचा स्टे अचानक उठल्याने ही कारवाई झालीय.
हेही वाचा… बारामतीचा इतिहास बदलणार, शरद पवारांच्या हातून बारामती निसटणार ?
पुढे अभिजित पाटील असेही म्हणाले की, ते आम्हाला मदत करत आहेत. तर आम्हीही त्यांना मदत केली पाहिजे. शेतकरी सभासदासाठी जे करावे लागेल ते आम्ही करू. यानंतर ते मदतीबाबत लवकरच सांगतील असेही ते म्हणाले. तर कारखाना वाचवायचा असेल तर कुठेही जावं लागेल असेही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“खेडका मंत्री लयच बोलायला लागलाय”, ओमराजे निंबाळकरांचा तानाजी सावंतांवर पलटवार
हेही वाचा…“प्रेमाचा वर्षाव हा मला भारावून टाकणारा”, सुनेत्रा पवारांचा खडकवासला दौरा चर्चेत
हेही वाचा…शिंदेंकडून नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, शांतिगीरी महाराजांची एकच चर्चा
हेही वाचा…“त्यासाठी विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला? राणाजगजीतसिंह पाटलांचा खोचक सवाल
हेही वाचा…“नरेंद्र मोदी पुण्यात येतील अन् म्हणतील की,..” सभेआधीच शरद पवारांनी मोदींना डिवचलं