पुणे : पंतप्रधान बारामतीत येऊन म्हटले की शरद पवारांचं बोट हातात धरून मी राजकारणात पावलं टाकली. त्यानंतर ८ महिन्यांनी निवडणुका झाल्या अन् त्या निवडणुकीला ते म्हणाले की, शरद पवारांना सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी जे जे काही करता येईल ते करा. लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु भूमिकेमध्ये विचारामध्ये सातत्य पाहिजे. दिल्लीत एक मुंबईत दोन आणि बारामतीत तीन असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली.
हेही वाचा….“३० वर्षात एखाद्या गावात साधा रस्ताही गितेंनी केला नाही”, तटकरे गीतेंवर बरसले
उद्या पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी नरेंद्र मोदींची सभा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मोदींवर टिका केलीय. प्रधानमंत्री हे देशातील सर्वात महत्वाचं पद आहे. त्या पदाची इज्जत ठेवणं ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे. पण त्याबरोबर त्या पदावर जे बसलेत त्यांनी सुद्धा त्या पदाची किमंत, प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला.
हेही वाचा…“मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार”, मुरलीधर मोहोळ
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात आल्यावर आमची आठवण येते. ते पुण्यात आल्यावर तुम्ही त्यांचं भाषण ऐका. नक्कीच ते सांगतील की पुणेकरांना माझा नमस्कार, याने त्या भाषणाची सुरूवात करतील. आणखी ते मराठी भाषेत बोलतील. त्यानंतर मग त्यांना आठवण येईल. शरद पवार आणखीन कुणी. किती गंमतीची गोष्ट आहे. म्हणजे एक दिवस गल्लीत भाषण केलं की, या देशामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्याचं ऐतिहासिक काम पवार साहब ने किया हे त्यांनी भाषण केलं. आणखीन काही गोष्टी सांगितल्या. असं म्हणत शरद पवारांनीही मोदींना डिवचलं.
READ ALSO :
हेही वाचा… बारामतीचा इतिहास बदलणार, शरद पवारांच्या हातून बारामती निसटणार ?
हेही वाचा…“हे खपवून घेतले जाणार नाही”, सुनील तटकरेंनी विरोधकांना दिला कडक इशारा
हेही वाचा…पंतप्रधान मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पकनेतून साकारली खास ‘दिग्विजय पगडी
हेही वाचा…“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट