पुणे : पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबत मोशी येथे केला. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बैंक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींमुळे २०१४ नंतर देशाने गतिमान प्रगती केली” , आढळराव पाटलांचं मोठं विधान
मेळाव्याला शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुक ही देशाची निवडणूक आहे. ती गावकी भावकीची निवडणूक नाही. मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारांसाठी आपण अशाच प्रकारचे मेळावे घेतले होते. सभा घेतल्या. त्यांना निवडून आणण्यासाठी आपण झटलो. त्यांना निवडून देखील आणले. मात्र निवडून आल्यानंतर दीड दोन वर्षातच कोरोनाचे संकट आले. ज्यांना आपण निवडून आणले ते माझ्याकडे राजीनामा घेऊन आले होते. त्यांना मी विचारले की तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे. असे करू नका.
हेही वाचा…“यापुर्वीच कर्तृत्व सिद्ध संधी मिळाली असती तर..”, सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली ‘ती’ खंत
आढळरावांकडे विकासाची दृष्टी
लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीतून येणारा निकाल आपले भविष्य ठरवत असतो. विकासात्मक पातळीवर देशाला पुढे नेण्याचे काम लोकसभेच्या निवडणुकीतून आपल्याला करायचे आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असणारा ताकतीचा नेता आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला संसदेत पाठवायचा आहे. शिरूर मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करायचे आहे असे आवाहन अजित पवार यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा….“३० वर्षात एखाद्या गावात साधा रस्ताही गितेंनी केला नाही”, तटकरे गीतेंवर बरसले
हेही वाचा…“मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार”, मुरलीधर मोहोळ
हेही वाचा…माढ्याचं राजकारण तापलं, फडणवीसांच्या खेळीने निंबाळकर बाजी पलटणार ?
हेही वाचा…“भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले, भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच”