रायगड : अनंत गिते यांनी ३० वर्षे खासदार असताना कुणबी समाजासाठी काय केले ? एखाद्या समाजाला निधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली नव्हती, ती घोषणा अजित पवार यांनी केली. गावावस्तीत जाऊन ही ऐतिहासिक निवडणूक लोकांना सांगण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत जनता साथ देईल आणि राज्यात ४५ +जागा मिळतील असा दावा रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केलाय. तसेच सर्वधर्मियांना सोबत घेऊन भविष्यात काम करणार आहे. असे आश्वासन देखील त्यांनी दिलं. गुहागर विधानसभा मतदारसंघातील हेदवी येथे महायुतीची जाहीर प्रचार सभा खारवी समाज भवनात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“यापुर्वीच कर्तृत्व सिद्ध संधी मिळाली असती तर..”, सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली ‘ती’ खंत
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “बकासुर, टकमक टोक, बूच अशी वक्तव्ये करत संसदेत काम अनंत गीते यांनी केले. ३० वर्षांत एखाद्या गावातील साधा रस्ताही अनंत गीते यांनी केला नाही. मी ऊर्जा मंत्री असताना राज्यातील भारनियमन रद्द करून जनतेला दिलासा दिला असेही तटकरे म्हणाले. तसेच “आज देश विकसित होत आहे. अनेक योजना खेड्यापाड्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात लस तयार केली त्या देशाचे नाव भारत आणि त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आणि यापुढेही राहतील. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…“खासदार निधीसुद्धा वापरता येत नाही असा निष्क्रिय खासदार”, तटकरेंचा गीतेंवर घणाघात
“तुमची – माझी श्रध्दा या संविधानावर आहे आणि कायम राहणार आहे. मात्र नरेंद्र मोदी संविधान बदलणार असे जाणीवपूर्वक सामाजिक पाप विरोधक करत आहेत. देशातील एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण मतदान करणार आहोत. या देशाची अखंडता, एकात्मता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिली आहे. देशात आणीबाणीच्या वेळी उद्रेक झाला आणि त्यातून चळवळ उभी राहून इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा पराभव झाला ही वस्तुस्थिती सांगताना ही लोकशाही प्रणाली जनतेने त्यावेळी दाखवून दिली असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, वेगवेगळ्या आघाड्यांची सरकारे त्याकाळात अनुभवायला मिळाली. आम्ही भाजपसोबत गेलो मात्र आम्ही आमचा सिध्दांत सोडून दिला नाही. सलग तीन वेळा सरकारे बनली एवढी अस्थिरता देशात निर्माण झाली होती. परंतु नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आणि राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आणि जनतेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करुन आज दहा वर्षांत झालेला विकास अनुभवत आहोत. दि. ४ जूनला ऐतिहासिक निकाल लागेल आणि त्यानंतर संविधानावर आज ओरड करत आहेत त्यांची ओरड नक्कीच थांबलेली दिसेल. असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार”, मुरलीधर मोहोळ
हेही वाचा…माढ्याचं राजकारण तापलं, फडणवीसांच्या खेळीने निंबाळकर बाजी पलटणार ?
हेही वाचा…“भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले, भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच”
हेही वाचा…“नरेंद्र मोदींमुळे २०१४ नंतर देशाने गतिमान प्रगती केली” , आढळराव पाटलांचं मोठं विधान