नाशिक : गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह राष्ट्रवादी, भाजपने दावा ठोकल्यानंतर आता शांतिगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा फॉर्म चुकून भरला अन् तो त्यांनी मागे घेऊन पुन्हा अपक्ष अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…पंतप्रधान मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पकनेतून साकारली खास ‘दिग्विजय पगडी
मागील काही दिवसापासून नाशकात शांतिगीरी महाराजांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आज गोदाघाट येथे जय बाबाजी भक्त परिवारातर्फे शांतिगीरी महाराजांसाठी मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. त्यानंतर शांतिगीरी महाराजांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे नाशकात तिरंगी लढत होणार की दुहेरी लढत होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट
दरम्यान, एका बाजूला महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात देखील करून दिलीय. तर दुसऱ्या बाजूला महायुतीत अजूनही नाशिकचा उमेदवार ठरेना झाला आहे. अशातच शांतिगीरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नेमक्या येणाऱ्या दिवसात काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“त्यासाठी विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला? राणाजगजीतसिंह पाटलांचा खोचक सवाल
हेही वाचा…“नरेंद्र मोदी पुण्यात येतील अन् म्हणतील की,..” सभेआधीच शरद पवारांनी मोदींना डिवचलं
हेही वाचा… बारामतीचा इतिहास बदलणार, शरद पवारांच्या हातून बारामती निसटणार ?
हेही वाचा…“हे खपवून घेतले जाणार नाही”, सुनील तटकरेंनी विरोधकांना दिला कडक इशारा