धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. महायुतीकडून अर्चना पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अशातच अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत महायुतीतील मंत्री तानाजी सावंतांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टिका केली. त्यावर आता भरसभेत तानाजी सावंत यांचा खेकडामंत्री उल्लेख करत ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंताना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा… बारामतीचा इतिहास बदलणार, शरद पवारांच्या हातून बारामती निसटणार ?
ओमराजे निंबाळकर यांनी एक रूपयांचा विकास केला ना कुणाला एक रूपयांची मदत केली. २००९ पासून आजपर्यंत त्यांच्या भाषणाची सुरूवात माझा बाप मारला, माझा बाप मारला अशी होते आहे. अरं काय लावलंय हे ? भावनेच्या आहारी जाऊन २००९ मध्ये जनतेनं एकदा आमदार केलं. त्याच जनतेनं २०१४ साली घरी बसवलं. एक रूपयाचा विकास केला ना एक रूपयांची कुणाला मदत नाही. धाराशिवमध्ये फक्त विकासाची भाषा चालते असे तानाजी सावंत यांनी म्हटले होते.
हेही वाचा…“हे खपवून घेतले जाणार नाही”, सुनील तटकरेंनी विरोधकांना दिला कडक इशारा
त्यावर आता ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ओमराजे निंबाळकर म्हणाले की, माझ्या आजपर्यंतच्या निवडणुकाच्या भाषणात एकदाही स्व.पवनराजे यांच्या हत्येचा विषय काढला नाही. उलट पवनराजे हयात असते तर ओमराजे बघायला ही भेटला नसता. इंजिनिअरिंग करून तिकडच बसला असता. बरं माझ्या वडलिांची हत्या झाली हे काय खोटं आहे का ? त्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वत : तिकडे आहे की पवनराजे यांच्या हत्येचे प्रकरण शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्ही गृहमंत्री आहात. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण द्या. एका महिन्यात निकाल लावा. तुमच्या हातात आहे. पण निकाल का देत नाही. असा सवालही त्यांनी केला.
निकाल दिला तर दोषी सापडणार हे त्यांना माहिती आहे. मात्र २००६ पासून २०१४ पासून आजपर्यंत केवळ प्रकरण वाढवायचं काम सुरू असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले. यातच तानाजी सावंत यांचा भरसभेत ओमराजे निंबाळकर यांनी खेकडा मंत्री, कोंबडी, अंडा, जर्सी गाय असा उल्लेखही त्यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…“प्रेमाचा वर्षाव हा मला भारावून टाकणारा”, सुनेत्रा पवारांचा खडकवासला दौरा चर्चेत
हेही वाचा…शिंदेंकडून नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, शांतिगीरी महाराजांची एकच चर्चा
हेही वाचा…“त्यासाठी विद्यमान खासदारांनी काय पाठपुरावा केला? राणाजगजीतसिंह पाटलांचा खोचक सवाल
हेही वाचा…“नरेंद्र मोदी पुण्यात येतील अन् म्हणतील की,..” सभेआधीच शरद पवारांनी मोदींना डिवचलं