पुणे : 4 जून च्या नंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार हे आता बाहेर पडणार आहेत. कारण 4 जून च्या नंतर अजित दादांची नौका ही बुडणार आहे. आणि त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी बसणार नाही. म्हणून स्वतः सुनील तटकरे हे देखील भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी नावेत बसण्याची तयारी करत आहेत. असा दावा शरद पवार गटाचे प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केला आहे.
हेही वाचा…घोंचू..! “मोदी खरोखरच देव आहेत, मग ते ध्यान कुणासाठी करतात ?”
पुढे बोलतांना शेख म्हणाले की, सुनील तटकरे यांना माहिती आहे की, भारतीय जनता पार्टीत जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. कारण त्यांना माहिती आहे की आता आपल्याला शरद पवार साहेबांकडे इंट्री मिळणार नाही. जे लोक शरद पवार साहेबांवर सिल्वर ओक वर प्रेम करतात. तेवढीच लोक आता आमच्या पक्षात शिल्लक राहिली आहेत.
हेही वाचा…“तर हे मंत्री नेमके कोणते उद्योग करतात? विरोधकांचा सरकारवर निशाणा
दरम्यान, जे जाणारे होते ते आता गेलेले आहेत. त्यामुळे अजून कोणी जाणार नाही. पण आपण बघितलं असेल गरवारे क्लबच्या बैठकीमध्ये की अजित पवार गट हा पूर्ण पराभूत मानसिकतेमध्ये गेलेला आहे. आणि आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी केविल वाणी धडपड आणि स्टेटमेंट हे अजित पवार गटातली मंडळी करत आहेत. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..मोठी बातमी…! मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय
हेही वाचा..“राज्यसभा सोडा, लोकसभेची उमेदवारी मी नाकारली”, नाराजीच्या चर्चेवर भुजबळांचं पुर्णविराम