मुंबई : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यातच राज्यातून भाजपच्या नऊ जागा जिंकून आल्या आहेत. यातील काही खासदारांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर आज पंतप्रधान कार्यालयाकडून नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे तसेच पुण्यातील पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना फोन आला आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद निश्चित झालं अशी माहिती आहे. यातच केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्री न मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दिल्लीत सध्या बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे.
राष्ट्रपती भवनासमोर नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी इतर देशातील बडे नेते देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. यातच राज्यातून महायुतीतील शिवसेना शिंदे गटासह, भाजपसह माजी मंत्री रामदास आठवले यांना देखील फोन आल्याची माहिती आहे. मात्र एक जागा जिंकलेल्या अजित पवार गटाला केंद्रात स्थान न मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
त्याच पार्श्वभूमीवर कालपासून प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. यातच सध्या अजित पवार गटातील छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासारखे बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. अजित पवार गटात फक्त सुनील तटकरे लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. तर राज्यसभेवर प्रफुल्ल पटेल यांची निवड झालीय. यातच काल अजित पवार गटाला एक मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. मात्र आज दिलेल्या सुत्रांनी माहितीनुसार त्यांना केंद्रात स्थान नसल्याचं सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांना मी सोडायला नव्हतं पाहिजे होतं”, कुणी केली खंत व्यक्त
हेही वाचा..ठरलं तर मग..! येत्या एक दोन आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ?