पुणे : देशात सर्वात जास्त चर्चेत ठरलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी आपला विजय कायम ठेवला. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा जवळपास एक लाखांच्या मताधिक्क्याने पराभव केला. आता सुनेत्रा पवार यांच्या पराभावाचा धक्का कार्यकर्त्यांना पचवणं अवघड जात आहे. अशात सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घ्या. अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा…“‘त्या’ पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली”, मोहोळांसाठी खास मित्राची पोस्ट
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिवस आज साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावळी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यासंदर्भात एक ठराव देखील मंजूर झालाय. यातच राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात एक राज्यमंत्री पद देखील देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आलीय. हा ठराव त्यांनी आता अजित पवारांना पाठवणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर दिल्लीत जाण्याचं स्वप्न सुनेत्रा पवारांचं अधुरं राहिलं. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांना दिल्लीत पाठवण्याचा जणू चंगच बांधला आहे. त्यामुळेच की काय पुणअयात आज झालेल्या बैठकीत याविषयी ठराव करण्यात आलाय. दुसरीकडे मुंबईत देखील अजित पवार गटाचा २५ वा वर्धापन दिवस साजरा केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आता कशी वाजवली घंटी”? ‘ते’ विधान शिंदेंना भोवलं..! कोल्हापुरात कॉंग्रेसने शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“शिवसेनेच्या बाबतीत भाजपने केंद्रात दुजाभाव केला,” श्रीरंग बारणेंकडून खदखद व्यक्त
हेही वाचा..विनोद तावडेंवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा ? विनोद तावडेंचं दिल्लीत वाढलं वजन
हेही वाचा..मोठी बातमी…! “पंतप्रधान पदाचा कारभार स्विकारल्यानंतर मोदींचा पहिलाच शेतकऱ्यांसाठी निर्णय”