मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. विधानसभेची निवडणुक भाजप आणि शिवसेना युती म्हणून लढविली. परंतु मुख्यमंत्रीपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी, अन् काॅंग्रेससोबत बंधन जुळवलं. यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार त्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर अजित पवार यांनी पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून आता शिंदे गटाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी अजित पवारांनी टोला हाणला आहे.
“राष्ट्रवादीवर टिका झाली की समजायचं आपण खुप ताकदवान”; जयंत पाटील
काल शिर्डी याठिकाणी राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात राज्यातील पक्ष फुटीवरून अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावरून त्यांनी खासकरून एकनाथ शिंदे गटाचे चिमटे काढले. यावरून दिपक केसरकरांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या घरात आग लागली, आधी ती विजवा. अजित दादा काय बोलले? याकडे शिवसैनिकांनी फारसं महत्व देण्याची गरज नाही. कारण यापुर्वी अजित पवार व त्यांच्या पक्षाने चार वेळा शिवसेना फोडली आहे. आणि ज्यावेळी तुम्ही काॅंग्रेसच सोडून नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा तुम्हाला हे वाक्य आठवले नाहीत का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
धक्कादायक..! शिवसेनेच्या नेत्यांवर गोळीबार..; हल्लाचा व्हिडीओ आला समोर
दरम्यान, पुढे बोलताना दिपक केसरकर म्हणाले की, सरकार आणणं, सरकार कोसळवणं हेच अजित पवार यांचे काम आहे. जनतेसाठी काम करणं हे आमचं काम आहे. अजित पवार यांनी आमचाही मान ठेवावा. ज्यांचा शपथविधी सकाळचा झाला तेच राक्षसीवृत्तीबाबत बोलत आहेत. आमच्या आणि अजित दादांच्या वागण्यामध्ये फरक आहे. असा टोला दिपक केसरकर यांनी लगावला.
Read also
- अंधेरी पोटनिवडणुकीत मतदारांनी केले घरून मतदान..! ९१.१६ टक्के मतदारांनी बजावला हक्क
- मावाळचं राजकारण तापलं..! मामा-भाचे यांच्यात दिवाळीनंतरही लेटर बॉम्ब फटाके
- “आम्ही कधीही विकासकामांमध्ये राजकारण केलं नाही”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला
- “हे बा-पांडुरंगा, महाराष्ट्रावर तुझी कृपा कायम ठेव”, आगामी निवडणुकांची वाट सोपी ; अजित पवार
- “राष्ट्रवादी काॅंग्रेसचे 12 नेते फुटले, फक्त मुहूर्त ठरायचा बाकी”