मुंबई : मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवरुन आवाहन करत शेतीचं नुकसान ऑनलाइन बघता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे. “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा.थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत ध्या. अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल,” असं ट्विट बाळा नांदगावकर यांनी केलं होत.त्याला आता शिवसेना नेते आणि राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
दादा भुसे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, मी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेत आहे. तसेच एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्रांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.
राज्यात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. शेतपिक आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 15, 2020
उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या ४ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुष्यहानी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
Read Also
ठाकरे सरकार कोसळणार ? राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय https://t.co/j0tbnqfjTr#MahavikasAaghadi #MVA #Thackaresarkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020