मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन आमचं सरकार आल्यावर ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली होती. आता त्याचं सरकार आलं आहे, तर त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भररपाई द्यावी, अशी मागणी रावसाहेब दानवे यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहे. त्यामुळे त्यांचे तेच पडतील, असं विधान देखील केंद्रीय कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी केल.मोदी सरकारच्या कृषी विधेयकांमुळे छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार असल्यानेच काँग्रेस या विधेयकांना विरोध करत असल्याचं रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितलं.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून भाजपाला लक्ष्य केले जात आहे. त्यावर रावसाहेब दानवे म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे आमच्या पक्षाची प्रतिमा मलीन होणार नसून, सीबीआय लवकरच सर्व गोष्टी बाहेर आणेल.
कृषी कायद्याला विरोध करत पंजाबमधील अकाली दलाने एनडीएची साथ सोडल्याबद्दल बोलताना दानवे म्हणाले की, पंजाबमध्ये बिलाला विरोध केल्या गेल्यामुळे आणि राज्यात अस्तित्वं टिकवायचं असल्याने ते बाहेर पडले आहेत. तसेच, राज्यातील आगामी निवडणुका पाहूनही त्यांनी ही भूमिका घेतल्याचे दानवेंनी यावेळी सांगितले.
Read Also
“जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार ?”https://t.co/Ob54hOKSQH#JitendraAvhad #MahavikasAaghadi #KiritSomaiya #BJP @KiritSomaiya
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020