शेतकऱ्यांना अजून पर्यंत पीककर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. अतिरिक्त कागदपत्रांमुळे शेतकऱ्यांची फरफट होत आहे. त्यामुळे सोमवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगांव पेठ येथील बँकेमध्ये भाजप आणि किसान मोर्चाच्या वतीने एक आंदोलन करण्यात आले. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
पिककर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला तर अधिकाऱ्यांच्या गळात फास टाकू #पिककर्जअभियान@BJP4Maharashtra pic.twitter.com/d9EydXmdwF
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) August 10, 2020
शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ बँकांनी आणली आहे यापुढे शेतकऱ्यांना त्रास झाल्यास हा फास आता बँक अधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकण्याचा इशारा डॉ. अनिल बोंडे यांनी दिला आहे.
एकीकडे राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी यांचे बँकेला आदेश असूनसुद्धा अनेक बँका या नं त्या कारणाने शेतकऱ्यांना कर्ज नाकारत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक शेतकर्यांच्या तक्रारी अनिल बोंडे यांच्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी या बँकेवर धडक दिली. शेतक्यांऱ्यांसमवेत नांदगाव पेठ येथील युनियन बँकेत धडक देत तेथील व्यवस्थापकाला इशारा दिला.