मुंबई : काल मुंबईसह उपनगरातील वीज पुरवठा जवळपास 2-3 तासांसाठी खंडित झाला होता. वीज पुरवठा ठप्प झाल्याने अनेक सेवांवर याचा परिणाम जाणवला. लोकल सेवा, इंटरनेट, हॉस्पिटलवर देखील याचे परिणाम दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी आता अमृत फडणवीसांनी सरकारवर टीका केली आहे.
Power doesn’t corrupt people , people corrupt power ! #MumbaiPowerFailure #powercut #PowerFailure #mumbaiblackout #Mumbaielectricity
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 12, 2020
सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर लोकच सत्तेला भ्रष्ट करतात, अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान, काल मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये वीज गेली होती. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूकीवर देखील याचा परिणाम झाला होता.