पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांच दोन्ही पवारांमध्ये लोकसभेची निवडणुक होत आहे. अशातच आता महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच आता शिवाजीराव पाटलांनी अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
हेही वाचा…महायुतीची वज्रमूठ, मोदींच्या सभेमुळे आढळरावांची ताकद वाढली
“गेली ३ महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळं ते घाणेरडे, खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप अमोल कोल्हे करू लागले आहेत. माझ्यावर केलेल्या आरोपांचे आता कोल्हेंनी पुरावे द्यावेत, मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो अन्यथा कोल्हेंनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं”, असं खुलं आव्हान शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांना दिलं आहे. अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर कांदाभावावरुन धारेवर धरलं होतं. त्यावर उत्तर देताना आढळरावांनी कोल्हेंवर आगपाखड केली आहे.
हेही वाचा…”घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं, दिपक मानकरांचा हटके प्रचार
अमोल कोल्हे काय म्हणाले होते? दोनचं दिवसांपूर्वी जुन्नरमधील शरद पवारांच्या सभेत कोल्हेंनी आढळरावांवर निशाणा साधला होता. ‘काहींनी १५ वर्षात शेती प्रश्नाऐवजी संरक्षण खात्याच्या प्रश्नांनाच प्राधान्य दिलं. सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि काँट्रॅक्ट कधी निघणार एवढीच त्यांना चिंता लागलेली होती. यावरून कोणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कोणाला फक्त आपली कंपनी वाढविण्याचा हव्यास आहे’, असा घणाघाती आरोप कोल्हेनी आढळराव पाटलांवर केला होता.
READ ALSO :
हेही वाचा…“महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरीही…” तटकरेंची सभा रामदास आठवलेंनी गाजवली
हेही वाचा….“पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर”, मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला विश्वास
हेही वाचा..‘अनंत गीते हिरवा साप, विद्वेष अन् वेगळी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न “, तटकरेंचा घणाघात
हेही वाचा…“काय वाटेल ती किंमत देऊ, पण या देशात आम्ही..,”मोदींच्या विरोधात शरद पवारांनी दंड थोपाटले