पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी खुला पंगा घेतला आहे. पवार यांच्यावर खरमरीत टीका करण्याच्या प्रचार रणनितीमुळे अजित पवार गटात संताप असून, कोल्हे यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याची भूमिका अजित पवार समर्थकांनी घेतली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुरंदर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार आणि पवार कुटुंबियांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. किंबहुना ‘पवारांना विरोध’ हाच शिवतारे यांच्या राजकीय वाटचालीचा आधार राहीला होता. त्यावेळी अजित पवार यांनी ‘‘यंदा बघतोच तू कसा आमदार होतो… एकदा अजित पवारने ठरवले ना… की एखाद्याला पाडायचे…ते मी करूनच दाखवत असतो..’’ असा सज्जड दम अजित पवार यांनी जाहीर सभेत शिवतारे यांना दिला होता. निवडणुकीचे निकाल समोर आले आणि शिवतारे पराभूत झाले.
आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर मतदार संघात अजित वार यांचा तो ‘पुरंदर पॅटर्न’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. त्यावेळी अजित पवार यांच्या शपथविधीला हजेरी लावली होती. त्यामुळे कोल्हे अजित पवार यांच्यासोबत राहतील, असा दावा केला जात होता. पण, कोल्हे यांनी शरद पवार यांच्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा…महायुतीच्या जागवाटपाचा अंतिम फॉर्म्युला, शिंदेंच्या जागा झाल्या कमी, वाचा सविस्तर
२०१९ मध्ये कोल्हे यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादी प्रवेश आणि शिरुरचे तिकीट देण्यापासून निवडणून अणण्यापर्यंत अजित पवार यांनी सर्व प्रक्रियेत जातीने लक्ष घातले होते. किंबहुना, वर्षभरानंतर खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी आलेल्या कोल्हे यांना अजित पवार यांनीच कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी मनधरणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोल्हे यांनी अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. त्यामुळे अजित पवार आणि समर्थकांच्या रडावर कोल्हे आहेत. ‘‘जो लोकांना वेळ देवू शकत नाही… तो अभिनेता… काय कामाचा..’’ असा नारा देण्यात आला असून, कोल्हे यांचा पराभव निश्चित करण्यासाठी अजित पवार यांनी स्वत: जातीने लक्ष घातले आहे.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर ‘वॉच’
महायुती अर्थात शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुख महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम सक्षमपणे करीत आहेत किंवा नाही? या अहवाल तयार करण्यासाठी ‘नमो टीम’ कामाला लागली आहे. हा अहवाल प्रदेश नेतृत्त्वाकडे देण्यात येणार असून, आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याच्या आधारे संबंधित इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील ‘परफॉर्मन्स’वर राजकीय भवितव्य अवलंबून असल्यामुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आता जोमाने कामाला लागले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“काय वाटेल ती किंमत देऊ, पण या देशात आम्ही..,”मोदींच्या विरोधात शरद पवारांनी दंड थोपाटले
हेही वाचा…महायुतीची वज्रमूठ, मोदींच्या सभेमुळे आढळरावांची ताकद वाढली
हेही वाचा…”घड्याळ पाहून पुढचं बटन दाबायचं, दिपक मानकरांचा हटके प्रचार
हेही वाचा…“त्याच सोनिया गांधींचे पाय धरत ठाकरे मुख्यमंत्री झाले”, तटकरेंचा ठाकरेंवर घणाघात