मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर भाजपचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. भाजपच्या दारूण पराभवानंतर आता तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे.
This bad beginning will surely lead to a good ending ! #JaiMaharashtra @BJP4Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 4, 2020
या वाईट गोष्टीच्या सुरुवातीची समाप्ती नक्कीच चांगली असेल, असे ट्विटर अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.
तर दुसरीकडे या निकालावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला. शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावे.