पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी निवडणुकीला सामोरे जात असताना आता मावळ लोकसभा मतदारसंघातला प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. या मतदारसंघांमध्ये माझा संपूर्णपणे दौरा झालेला आहे. या मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा मतदार हे माझ्या बाजूने कौल देतील, असं आत्मविश्वास मला वाटतंय. माझ्या कामावरती, तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावरती या भागातील मतदार खूश आहेत. एकूण देशाचे चित्र पाहता मतदारांनी या निवडणुकीमध्ये ठरवलेले आहे की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये गेल्या दहा वर्षातून केलेल्या कामाबरोबरच या मतदारसंघांमध्ये नागरिकांशी असलेल्या माझा स्मृतिगत संबंध त्याच्यातून मला मोठा फायदा होईल. असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“मुरलीधर मोहोळांच्या रूपाने नरेंद्र मोदींना मत द्या”, पुण्यात फडणवीसांचं मतदारांना आवाहन
पुढे बोलतांना श्रीरंग बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की, विकासकामे झाली नाहीत असा आरोप फक्त विरोधी पक्षाकडून केले जातात. जो उमेदवार माझ्यासमोर केलेला आहे. त्या पक्षाचा तो एक निष्ठ आहे का ? तो कोणत्या पक्षातून आलाय ? त्याचं आत्मपरीक्षण करावा आणि विकास काम झाली नाही असं म्हणतात, मी विकास कामाच्या बाबतीमध्ये विकास पर्व माझं पुस्तक छापलेलं आहे. या मतदारसंघांमध्ये आदिवासी भागामध्ये लाईट पसवण्याचे काम असेल, रस्ते बसवण्याचं काम असेल, रेल्वेच्या बाबतीमध्ये या मतदार संघामध्ये केलेलं काम असेल, रेल्वेचे नवीन मार्ग पनवेल ते कर्जत असेल, पनवेलचे पुरण असेल, पुणे चौथा ट्रेकला मंजुरी मिळण्याच्या संदर्भात असेल, अमृत भारत योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनचा कायापलट करण्याच्या संदर्भात असेल, गडकरींच्या माध्यमातून रस्त्याचे जाळे निर्माण करण्याच्या संदर्भात असेल , पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये अनेक कामे केली आहेत.
हेही वाचा…“पठ्ठ्या तु आमदारच कसा होतो, तेच बघतो,” शरद पवारांच्या नेत्याचा अजितदादांचं चॅलेंज
ज्यांनी खरंतर डोळ्यावरती पट्टी काढलेली नाही. त्याला अशा प्रकारचा विकास दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच या देशांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली काम, फॉस्फर सेवा केंद्र या माध्यमातून केंद्र उभं केलं, जवळपास तीन लाख नागरिकांनी पासपोर्ट केंद्रातून सहभाग घेऊन त्याचा लाभ घेतला, क्रांतिवीर चाफेकर यांच्या नावाने तिकीट मी काढलं. मोठा निधीचा बिगर वाड्यांना दिला आणि ही काम जर दिसत नसेल तर ती शोकांतिका आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसतोय आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप करतात. असं प्रत्युत्तर देखील बारणेंनी दिलंय.
निवडणुकीच्या माध्यमातून विरोधक बालिशपणाचे आरोप करतात. खरंतर या आशा निवडणुकीला सामोरे गेलेले नाहीत, त्यांनी वार्डाच्या निवडणुका लढल्यात अन् त्यामुळे माझ्यावर आरोप करतात. मला आरोप करायचे नाही. मी विकासाला महत्त्व देतो. कामाला महत्त्व देतो. या निवडणुकीमध्ये मतदारांनी मात्र ठरवलेलं आहे की विकासाला मत द्यायचं. असेही ते म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही निर्णय घेतलेत. त्या निर्णयामध्ये राम मंदिराचा निर्णय असेल, त्या निर्णयामध्ये विकासात दृष्टिकोनातून या देशांमध्ये उचललेली पाऊल असतील, संरक्षण विषयक असेल, रेल्वेच्या जाळी निर्माण करण्याच्या संदर्भात असेल, रस्त्याच्या संदर्भामध्ये असेल, या देशातील महिलांना मोठ्या प्रकारचा आधार देण्याचं काम महिला विधेयकाच्या माध्यमातून असेल, तीन तलाकाच्या माध्यमातून असेल, किंवा अन्य बाबतीमध्ये असेल. या देशातील जवळपास सात कोटी नागरिकांना हेल्थ कार्ड देऊन पाच लाखापर्यंत त्यांना एक विम्याचे संरक्षण देऊन आरोग्य विषयक दिलेले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये टाकण्याचा मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीने देश चालवत असताना मोठे महत्वकांशी निर्णय घेतले. या सगळ्या बाबतीत जर विचार केला तर या निवडणुकीमध्ये हा तफावत दिसते. झालेली वाटचाल एकूणच भारत देश प्रगतीपदावरती प्रगतीची आणि जगाच्या पाठीवरती भारत देश सक्षम होते. या निवडणुकीमध्ये ते मतदाराला जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा..“धर्माभिमानी, शिव-शंभूप्रेमी नागरिकांनी महायुतीला मतदान करा”, महेश लांडगे यांचं आवाहन
हेही वाचा…मोदींची शरद पवारांना ऑफर, शरद पवारांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…मुरलीधर मोहोळ vs रवींद्र धंगेकर; पुणेकरांच्या मनात नेमकं काय ?
हेही वाचा…“विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल,” अजित पवारांनी शिरूरकरांसाठी दिली ग्वाही
हेही वाचा…“पठ्ठ्या तु आमदारच कसा होतो, तेच बघतो,” शरद पवारांच्या नेत्याचा अजितदादांचं चॅलेंज