मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामुहिक बालात्कार पीडित 19 वर्षीय दलित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पीडितेला श्रद्धांजली देण्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल, असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे.
अनिल देशमुख यांनी ट्विट केले की, उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. योगी आदित्यनाथ गुन्हेगारांना शासन करा. पण ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल.
दरम्यान, पीडित तरूणीची 14 सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर काल तिची प्राणज्योत मालवली.