मुंबई : मराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. यावर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे
” आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे अनेक युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे. समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची मागणी आहे. गरज पडल्यास आपण सर्वांनी रस्त्यावरती पुन्हा उतरण्याची तयारी ठेवावी. मी एक सर्व सामान्य युवती म्हणून सर्वांना सांगू इच्छिते की, समाज जो निर्णय घेईल तीच माझी भूमिका असेल” ,असे ट्विट अंकिता पाटील यांनी केले आहे
तसेच ‘मराठा आरक्षणास कोर्टाच्या वतीने स्थगिती देण्यात आली आहे. हा मराठा समाजावर झालेला अन्याय आहे. आम्हा सर्वांना न्याय व्यवस्थेचा व राज्यघटनेचा आदर आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लाखो नागरिक रस्त्यावरून उतरून शांततापूर्वक आंदोलने केले, मोर्चे काढले, त्याग केला आहे’ असेही त्या म्हणल्या.
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे अनेक युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे. समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची मागणी आहे. गरज पडल्यास आपण सर्वांनी रस्त्यावरती पुन्हा उतरण्याची तयारी ठेवावी. मी एक सर्व सामान्य युवती म्हणून सर्वांना सांगू इच्छिते की, समाज जो निर्णय घेईल तीच माझी भूमिका असेल.
— Ankita Harshvardhan Patil (@Ankita_H_Patil) September 9, 2020
दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.आदेश मागे घेण्यासाठी सोमवारी सुप्रीम कोर्टात सरकार अर्ज करणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपसमितीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत उद्या चर्चा करून कसा अर्ज भरायचा याचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.