मुंबई : राज्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला करोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. मात्र लसींचे डोस अपुरे असल्यामुळे आणि नव्या डोसचा पुरवठा देखील पुरेसा नसल्यामुळे, लगेच १ मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती देखील यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, “महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्राथमिक स्वरूपात, काही निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल, पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरुवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल आणि लस देखील अतिशय नाममात्र स्वरूपात आहे”, असं राजेश टोपेंनी नमूद केलं.
Maharashtra CM believes that vaccination must start vaccination from May 1, when Maharashtra Day is celebrated. So just for the inauguration, we will start a nominal vaccination drive on that day: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/KEgOnVFsou
— ANI (@ANI) April 30, 2021
तसेच, मे महिन्यात सिरम लसीचे १३ ते १४ लाख डोस देणार आहे, तर भारत बायोटेक कोवॅक्सिनचे ४ ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करू शकलो, तर ते करता येऊ शकेल, असं सांगताना त्यांनी, ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांना दुसरा डोस द्यावाच लागेल. तो पूर्ण करणं गरजेचं आहे”, असं स्पष्ट केलं.