अमरावती :काँग्रेस नेते आशिष देशमुख अमरावतीतून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल नियुक्त जागांचं घोंगडं भिजत असल्याने त्यांनी अमरावतीकडे मोर्चा वळवल्याचं सांगितलं जात आहे. 2019ला आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर काँग्रेसनं आशिष देशमुख यांच्या पुनर्वसनाचं आश्वासन दिलं होतं. पण या सर्व प्रकारावर आशिष देशमुख यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार असून, आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून सतीश चव्हाण आणि नागपूरमधून अनिल सोले यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपला. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणूक जिंकून विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त राहिली. एकूण पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा रिक्त आहेत. तर शिक्षक मतदरासंघातून अमरावती विभागातून श्रीकांत देशपांडे आणि पुणे विभागातून दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळसुद्धा जुलै महिन्यात संपला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून अमरावती आणि पुणे विभागाच्या दोन जागा रिक्त आहेत. या पाचही जागांवर 1 डिसेंबरला मतदान होणार आहे.
Read Also :