मुंबई : मेट्रो कारशेडवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसचे नेते सचिन सावंत आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत सावंतांवर टीका केली आहे. “कांजुरमार्गच्या जागेवर एकूण किती दावे प्रलंबित आहेत आणि खर्च किती वाढणार हे महाविकास आघाडी सरकारनेच गठीत केलेल्या मनोज सौनिक समितीने स्पष्ट केलेय. त्यामुळे सत्य सचिन सावंत प्रमाणे संभ्रमित होणार नाही. सावंत आणि पक्षाचा इतिहास पाहता या भूखंडांचा मोठा कट तिघाडीत शिजतोय हे नक्की”
दरम्यान काँग्रेसचे सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “फडणवीस सरकारचा कांजूरमार्गची १०१ एकर जमीन लिटिगेशन मधून काढण्याचा CA 2521/2015 हा अर्ज सरकारनेच मागे घेतला. कारण दावेदार सुरेश बाफना यांनी सांगितले की सदर जमीन ही सरकारी आहे. आमचा कोणताही दावा नाही. असे असताना ५००० कोटी खाजगी दावेदाराला द्यावे लागतील असे फडणवीस खोटे का म्हणाले?” अशी टीका सावंत यांनी केली आहे.