मुंबई : शिवसैनिकांकडून एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. यावरुनही सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आता पुन्हा एकदा याच विषयावरुन भाजप नेते आशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई बाँम्ब स्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा
आणि
देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा
वा रे वा!
विवेक बुध्दी गहाण ठेवली काय?
हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की,
तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 15, 2020
समता नगर पोलिसांनी या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. यावरूनच शेलारांनी सरकारवर हल्लाबोलकेला आहे. हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी? असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान अभिनेत्री कंगना आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या वादाच्या दरम्यान उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकारी यांना मारहाण केली होती यानंतर या आरोपीना अटक करण्यात आली मात्र त्यांना लगेच जामीन मंजूर करण्यात आल्याने विरोधकांनी सडकून टीका केली आहे.