मुंबई – उन्हाळा आला की मुंबईमध्ये नेहमीच पाणीटंचाईची समस्या जाणवते मात्र मुंबईची तहान भागवण्यासाठी चक्क समुद्राचा पाणी वापरण्यात येणारे पालघरच्या मनोरमध्ये समुद्राचा क्षारयुक्त पाणी गोड करण्याच्या सोळाशे कोटींच्या प्रकल्पाला 2021 मध्ये सुरुवात होणार आहे समुद्रातील पाण्याचे क्षार कडून हे पाणी गोडं करण्याचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे तर जून 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सांगितले जत आहे त्यामुळे कदाचित 2023 मध्ये मुंबईकरांची पाणीटंचाईच्या समस्येतून सुटका होणार आहे.
मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का? असा सवाल सरकारला केला आहे. शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून फेरविचार करण्याची विनंती केली आहे.
“समुद्राचे पाणी गोडे करुन मुंबईकरांची तहाण भागवणाऱ्या प्रकल्पावर 1600 कोटी रुपये खर्च होणार आहेत… खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का? या बाबत आज @mybmc आयुक्तांना पत्र लिहून फेरविचार करण्याची विनंती केलेय!” असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.
समुद्राचे पाणी गोडे करुन मुंबईकरांची तहाण भागवणाऱ्या प्रकल्पावर 1600 कोटी रुपये खर्च होणार आहेत…
खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का?
या बाबत आज @mybmc आयुक्तांना पत्र लिहून फेरविचार करण्याची विनंती केलेय! pic.twitter.com/QT9Qvp8hwV— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 25, 2020