मुंबई – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपने म्हनतीचे कौतुक करत संजय राऊत यांनी मोदी सरकारला चिंता काढला आहे. “पश्चिम बंगालमध्ये भाजपने मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीचं कौतुकच आहे. पण ममता बॅनर्जी यांना हरवणं तितकं सोपं नाही’, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला.
पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल हाती येत आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुद्दूचेरी आणि तामिळनाडू सोडून कुठेच सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये दीदीच येणार आहेत. ममता बॅनर्जींना हरवणं तितकसं सोपं नाही, असं राऊत म्हणाले.
ममता बॅनर्जी या जिगरबाज नेत्या आहेत. त्यांनी भाजपचं आव्हान स्विकारलं. आव्हान स्विकारण्याची धमक त्यांनी दाखवली. त्याचं कौतुक केलंच पाहिजे. एवढंच नाही तर त्या दोन जागांवर लढल्या नाही. त्या एकाच जागेवर उभ्या राहिल्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं. बंगालमध्ये पुन्हा दीदीच येतील याचा आम्हाला विश्वास आहे, असंही ते म्हणाले.
तामिळनाडू आणि पुद्दुचेरी सोडून कुठेही सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची सत्ता येईल. केरळमध्ये सत्ता बदल होताना दिसत नाही. दुपारपर्यंत निवडणुकीचा माहौल कमी होईल. बंगालमध्ये भाजपचा आकडा वाढत आहे. त्यांची मेहनत आहे. गुंतवणूकही आहे. या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये ठाण मांडून होते, असा चिमटा त्यांनी काढला.