मुंबई: विधानभवनाच्या बाहेर आमदार सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केल्याने पोलीसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. विधीमंडळात प्रश्न मांडू देत नाहीत, म्हणून आज रस्त्यावर उतरुन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करावी लागत आहे.
स्वप्नील लोणकर यांनी केली आत्महत्या नसून, ठाकरे सरकाच्या कुचकामी धोरणाने खुण केला आहे. यांना पार्थ पवार, आदित्य ठाकरे यांच्या भविष्याची चिंता आहे. मात्र महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थीचे काही देणे घेणे नाही. दिवसरात्र अभ्यास करतात, आणि सरकार लाखो विद्यार्थांना वाऱ्यावर सोडले आहे.
स्वप्नील लोणकर हा एमपीएससीची २०१९ ची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षापासून त्याची मुलाखत झाली नव्हती. त्यामुळे तो तणावात होता. त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली होती. ती पूर्व परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. या तवाच्या कारणातून आत्महत्या करण्यात आली होती. अजून किती विद्यार्थांची वाट बघणार आत्महत्या होण्याची हे सरकार कुणास ठाऊक.
एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर
”एखाद्या मंत्र्यांच्या मुलाने आत्महत्या केली असती तर त्यांना जाग आली असती की नाही. दुसऱ्याच्या जीवाचा सुद्धा विचार करावा. आज आमच्यावर काय परिस्थिती आली. आम्ही त्याला मोठे केले त्याला शिकवले. आज नोकरी मिळण्या आधीच सरकारने त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. फक्त यांची भांडणे, जगात काय चालले याचे यांना काही देणेघेणे नाही, फक्त राजकारण आणि राजकारण. माझा मुलागा माझ्याशी बोलत होता. तो म्हणायचा आई माझी मुलाखत झाली नाही. गरीबांच्या मुलांचे यांना काही देणेघेणे नाही. त्यांची मुले आहेत सुरक्षीत, अशा शब्दात एमपीएसी करणाऱ्या स्वप्पीलने केलेल्या आत्महत्त्येवर त्याच्या आपला आक्रोश व्यक्त केला.