मुंबई : उत्तर प्रदेशात नवी बॉलिवूडनगरी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी यांनी केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बॉलिवूड हलवणाऱ्यांच्या प्रयत्नांवर ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार तोफ डागण्यात आली आहे.त्यानंतर आता सामानातील विधानांवरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मोठा सवाल उपस्थित केला आहे.
मुंबईतून बॉलीवूड हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलीवूडच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.त्यावर भातखळकरांनी ट्विट करत शिवसेनेला सवाल केला आहे. भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,सत्ताधारी पक्ष या नात्याने शिवसेनेने बॉलीवुड एवढीच महाराष्ट्राच्या संकटग्रस्त जनतेची चिंता केली असती तर ???
भाजप आमदार सातत्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत आणि सत्ताधाऱ्यांबाबत वारंवार सोशल मीडियावरून व्यक्त होत असतात आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारात असतात.
‘सामना’नं काय म्हटलंय ?
बॉलिवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून हलवण्याइतके ते सोपे नाही. मुख्यमंत्र्यांनी या क्षेत्रातील प्रमुख लोकांशी चर्चा केली आणि त्यांना दिलासा दिला, हे योग्यच झाले. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने भारतीय सिनेसृष्टीचा पाया मुंबई-महाराष्ट्रात घातला. हा पाया कच्च्या पायावर उभा नाही. लवकरच ‘पडदे’ जिवंत होतील, बॉलिवूडला जाग येईल. मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायला हवा, असे सामना संपादकीयात म्हटले आहे.
कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही – शिवसेना
सत्ताधारी पक्ष या नात्याने शिवसेनेने बॉलीवुड एवढीच महाराष्ट्राच्या संकटग्रस्त जनतेची चिंता केली असती तर??? pic.twitter.com/t0BMd4FMrm— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 17, 2020
Read Also
जय माता दी… PM मोदींनी देशवासियांना दिल्या नवरात्रीच्या 'या' खास शुभेच्छाhttps://t.co/AYWOT82qj4#PMModi #Navratrispecial
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 17, 2020