मुंबई : अकबरूद्दीन ओवेसी काल औरंगाबाद याठिकाणी ओरंगजेबाच्या कबरी समोर नतमस्तक होतो. त्यावर भाजपने टिका केली. मात्र आतापर्यंत भाजपच्या काळात 20 वेळा तो ओरंगजेबाच्या कबरी समोर गेला आहे. ओरंगजेबाला आम्हीच गाडलं आहे. ओंरगजेबाचा जन्म गुजरातमधील दहोद गावात झाला आहे. महाराष्ट्रवर सातत्याने आक्रमन का होताहेत. हे आता तुम्हाला समजलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भोगलं होतं. तेच आम्ही आता भोगत आहोत. असंही ते म्हणालेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले की, पाकिस्तान आणि त्यांनी निर्माण केलेले दहशतवादीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना घाबरायचे. म्हणायला कमीपणा वाटत असताना बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ अशी घोषणा केली. असंही ते म्हणालेत.
मी आज इथे येत असताना मला खूप गर्दी दिसली. त्या सर्व जनतेमध्ये मला पंचमुखी हनुमान दिसले, श्रीराम, जानकी व लक्ष्मण दिसले, गणपती बाप्पा दिसले. ही सर्व लोकंच आमची कवचकुंडल आहेत. शिवसैनिकांमध्ये आम्हाला बाळासाहेब ठाकरे दिसलेत. शिवसैनिक म्हणजे आमचं कवचकुंडल आहे. कोविड काळात शिवसेनेने खुप काम केलीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करीत आहेत. असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तर शिवसेना हा पक्ष किंवा संघटना नाही तर शिवसेना एक विचार आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.