नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. तीन प्रमुख पक्षांसह अपक्ष अशी बहुरंगी आणि रंगतदार लढत होणार असल्याचे चित्र आहे. आता प्रचारासाठी केवळ आठ दिवसांचा अवधी उरला असल्याने संपुर्ण मतदारसंघात उमेदवारांच्या दौऱ्यांनी धुराळा उडाला आहे. महायुतीकडून हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा…“मागील १५ वर्षांत मी काम केलं, अन् त्यांनी ५ वर्षात फक्त कामाचा अभिनय केला”
हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरून नाशकात महायुतीत मोठा गोंधळ बघायला मिळाला. शेवटच्या क्षणी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली तर अन्य पक्षांच्या तुलनेत उमेदवारीचा घोळ न घालता महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वाजे यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला असून जवळपास २६ दिवसांमध्ये त्यांनी दररोज १४ तास प्रचार करीत २५० गावे पिंजून काढली आहेत.
हेही वाचा…“जो सध्या बोलबच्चन करतोय, त्याला मीच शोधून आणलं होतं”, अजित पवारांचा कोल्हेंवर निशाणा
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या नावाची क्रमवारी ईव्हीएमवर बदलण्यात आल्याने मंगळवारी उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला. उमेदवारी अर्जावर गोडसे यांचे नाव हेमंत तुकाराम गोडसे असे नमूद होते. त्यामुळे ईव्हीएमवर त्यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु, त्यांनी आडनाव आधी लावून गोडसे हेमंत तुकाराम असा नामोल्लेख करावा असा अर्ज सादर केल्याने त्यांचे नाव आता तीनऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आले आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आता तिसऱ्या स्थानी असतील.
READ ALSO :
हेही वाचा…बारामतीच्या लढतीत खडकवासला किंग मेकर ठरणार, कुणाची धाकधुक वाढली ?
हेही वाचा..श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी घेतला पुढाकार ; म्हणून महायुतीला देऊया साथ..!
हेही वाचा…“भावजयीचा पराभव करण्यासाठी नणंद मैदानात”, सासरा सुनबाईंच्या प्रचारात