नवीदिल्ली : बाबरी मशीद पतन प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोश मुक्तता केली आहे.
6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशिद पाडली गेली या दरम्यान सुरुवातीच्या जिल्हा न्यायालय नंतर अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण विविध टप्प्यावर सुनावणीला आले आहे. मात्र आज याबाबतचा महत्वाचा निर्णय येणार होता. बाबरी मशीद पूर्वनियोजित कट नव्हता असं स्पष्ट मत आज न्यायालयाने व्यक्त केलं आहे.
All accused in Babri Masjid demolition case acquitted by Special CBI Court in Lucknow, Uttar Pradesh. pic.twitter.com/9jbFZAVstH
— ANI (@ANI) September 30, 2020
याबाबत सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी आरोपींची सर्व माहिती मागवली, आज यापैकी 26 आरोपी कोर्टात उपस्थित होते तर उर्वरित सहा जणांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारच्या पहिला शिलान्यास सोहळा ते 6 डिसेंबर 1992 ला बाबरी पाडली गेली या दरम्यान सुरुवातीच्या जिल्हा न्यायालय नंतर अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण विविध टप्प्यावर सुनावणीला आले आहे. ह्या दरम्यान अनेक रंजक घडामोडी घडल्या. देशातला एका मोठा समुदायास या निकालाची प्रतिक्षा होता आणि आज त्याबाबत निकाल आला. निकालानंतर विश्व हिंदू परिषदेकडून मोठा जल्लोष करण्यात आल्याचे पहायला मिळाले.
Read Also
उत्तर प्रदेशातील ‘ही’ अमानुष घटना; अजितदादांनी व्यक्त केला तीव्र संतापhttps://t.co/qtaB0n3rKW @AjitPawarSpeaks @NCPspeaks @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020