कल्याण : कल्याणमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे आमदार राजू पाटील आणि मनसे नेते कार्यकर्त्यांनी कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट घेतली. अंबरनाथ येथील मनसे उपशहर प्रमुख यांची हत्या आणि उल्हासनगर येथील मनसे कार्यकर्ते या दोन्ही प्रकरणातील आरोपींना त्वरित पकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाईची मागणी यावेळी बाळा नांदगावकर यांच्यासह मनसे नेत्यांनी अप्पर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली.
मनसेचे अंबरनाथ उपशहर प्रमुख राकेश पाटील यांच्या हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला त्वरीत पकडून मोक्का लावण्यात यावा. तसेच मनसे उल्हासनगर मधील कार्यकर्ते मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणारे आरोपी त्वरीत पकडा या मागणीसाठी आज मनसे नेते बाळा नांदगावकर हे कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या भेटीसाठी कल्याणमध्ये आले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर चांगलीच टोलेबाजी केली. जीएसटी रक्कम अजून केंद्राकडून मिळालेली नाही. असे राज्य सरकार बोलत आहेत.
अर्थमंत्री जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगतात 60 हजार कोटी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 30 हजार कोटी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात 38 हजार कोटी नक्की किती पैसा येणार आहेत हे सर्वांनी बसवून ठरवावे असा टोला यावेळी बाळा नांदगावकर यांनी महाविकास आघाडीला लगावला.
रेल्वे व धार्मिक स्थळे सामान्य नागरिकांसाठी सुरू करावी वाटलं तर श्रेय तुम्ही घ्या. तुमचं श्रेय तुम्हाला लाखलभो. आणि असेच मुलाखती देऊन तुमचं अभिनंदन करू असाही टोला नांदगावकरांनी राज्य सरकारला लगावला आहे. मागच्या कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या वेळी 6500 कोटीची घोषणा केली होती. त्यातले 600 रुपये तरी आले असतील अशी अपेक्षा करतो. तसेच मनसे ने केलेलं नाशिक मधील काम पाहावे व लोकांनी विचार करावा. असे नांदगावकारांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
Read Also ;
माजी मंत्री गिरीश महाजनांच्या गाडीवर दगडफेक, भाजपात खळबळ https://t.co/S5yuwzmZqW @girishdmahajan
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 31, 2020