लॉकडाऊन काळात वांद्रे स्टेशनवर 14 एप्रिलला गर्दी जमा झाली होती. त्यावरून पोलिसांनी एकूण तीन गुन्हे दाखल केले होते. त्यात एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी राहुल कुलकर्णी यांना 15 एप्रिलला पहाटे उस्मानाबाद येथील माझ्या घरून अटक केली. त्यानंतर आता राहुल कुलकर्णी यांना अटक करणं ही आपली चूक झाल्याचे पोलिसांनी मान्य केले आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकावरील गर्दी प्रकरणात प्रकरणात राहुल कुलकर्णी यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे सकृतदर्शनी आढळून येत नसल्याने, त्यांना कलम 169 सीआरपीसीप्रमाणे सदर गुन्ह्यातून मुक्त करण्याची विनंती पोलिसांनी कोर्टाला केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचे ‘वस्तुस्थितीची चुक’ या सदराखाली ‘क’ वर्गीकरण होण्याची देखील विनंती पोलिसांनी कोर्टाकडे केली आहे.