मुंबई : गेल्या अनेक महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहिला आहे. त्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील निवडणुकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. यावर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
“ओबीसी समाजाच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने जिंकल्याचं समाधान”
महाविकास आघाडी महिनाभरात ओबीसी आरक्षण होते परंतु जाणीवपुर्वक ते आरक्षण नाकारत होते. त्यामुळे आता त्यांनी चुल्लुभर पाण्यात डूबुन मरावं. अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास मान्यता देण्याच्या सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे यासाठी आम्ही प्रयत्न केले व त्या प्रयत्नांना यश आल्याचे मला समाधान आहे. बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे आता २७ टक्के राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला मिळेल. शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. असंही ते म्हणाले.
“चित्रा ताई, डोके ठिकाणावर आहे का”? रूपाली पाटील चित्रा वाघ यांच्यावर कडाडल्या
चंद्रशेखर बावनकुळे यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, बावनकुळे साहेब आपण स्वप्नात राहू नका. आपल्या केंद्र सरकारने इम्पेरीकल डेटा मागच्या काळात राज्य सरकारला न दिल्यामुळे ओबीसीचे आरक्षण गेले. मविआ सरकारने बांठीया आयोग स्थापन करून 27 टक्के आरक्षण देऊन ओबीसी बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय दिला असंही ते म्हणाले.
“ओबीसी आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा केला”; आमदार महेश लांडगे
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारून ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास आज मान्यता दिली. न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई महाराष्ट्राने आज जिंकली याचे समाधान वाटते. हे आरक्षण टिकावे यासाठी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वाने प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज त्याची परिणती या निर्णयात दिसली. मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करत राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. ओबीसी समाजासोबत आम्ही नेहमीच असून त्यांच्या उन्नतीप्रतिची बांधिलकी कायमच राहील, याचा पुनरुच्चार या निमित्ताने करतो. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
Read also
- “फडणवीस हे बालिशच आहेत, सत्तेसाठी आसुरलेले नेते”; राष्ट्रवादीचा फडणवीसांवर हल्लाबोल
- भाजपच्या 4 आमदारांची आर्थिक फसवणुक करणारा पोलिसांच्या ताब्यात
- “राऊतांना राष्ट्रवादीत जायचं आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेना फोडली”; रामदास आठवलेंचं वक्तव्य
- मी आज मुख्यमंत्री नसलो तरी…; OBC आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
- द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा? आज ठरणार देशाचा 15 वा राष्ट्रपती कोण? वाचा सविस्तर