पुणे : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या त्रासाला कंटाळून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार करीत होते. मात्र आज झालेल्या न्यायालयाच्या सुनावणीत बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य नसल्याने त्यांनी आपला नेता बदलला असं शिंदे गटातील वकिलांनी सांगितलं. त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर राष्ट्रवादीने टिकास्त्र सोडलं आहे.
“जे चालवलय ते बरे नव्हे शिंदे साहेब, फडणीसांच्या नादाला लागुन राज्य अधोगतीकडे नेत आहात”
राष्ट्रवादीचे पुणे शहाराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यासंदर्भात माफी मागावी असं देखील म्हटलं आहे. ते म्हणाले की, गद्दारांनी शिवसेना सोडताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर बिनबुडाचे आरोप केले. काल कोर्टात बोलताना मात्र मुख्यमंत्री भेटत नव्हते म्हणून बंड केले असं सांगितलं. कोर्टात सांगितलेलं कारण खरं असेल तर अलीबाबा व त्याच्या 40 चोरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जाहीर माफी मागावी.
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजुंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यावर आता येत्या सोमवारी सुनावणी होणार असून हे प्रकरण आता पाच खंडपीठाकडे जाणार का ? ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे. यातच राज्यपालांच्या भूमिकेवरून राज्यातील राजकीय तज्ज्ञांनी प्रश्निचिन्ह उपस्थित केलं आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन
दरम्यान, उल्हास बापट यांनी मांडलेल्या विचारांचा आधार घेत अमोल मिटकरी यांनी याप्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, संघराज्यामध्ये राज्यपालांचा सहभाग महत्त्वाचा व राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असे घटना तज्ञांचे मत असले तरी महाराष्ट्राच्या राज्यपालांना संघराज्य म्हणजे “रेशीमबाग” असेच वाटत असावे,म्हणून ते संघाला पोषक असे वागतात. राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करायला वेळ काढावा.
गद्दारांनी शिवसेना सोडताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर बिनबुडाचे आरोप केले. काल कोर्टात बोलताना मात्र मुख्यमंत्री भेटत नव्हते म्हणून बंड केले असं सांगितलं. कोर्टात सांगितलेलं कारण खरं असेल तर अलीबाबा व त्याच्या 40 चोरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जाहीर माफी मागावी.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) August 4, 2022
Read also
- “न्यायालयाचा ‘हा’ निर्णय सगळ्यांना प्रभावी ठरणारा होऊ शकतो”
- “महाराष्ट्राच्या राज्यपालांना संघराज्य म्हणजे “रेशीमबाग” असेच वाटत असावे”
- “शिवसेना अन् पक्ष चिन्हांबाबत निर्णय घेऊ नका”; न्यायालयाचे आदेश, ठाकरेंना दिलासा
- “न्यायालयात स्पष्ट झालं की, शिंदे गट सत्तेसाठी भाजपच्या कुशीत जाऊन बसला”
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनणार भावी विश्वगुरु? मोदीला पण मागे टाकणार