धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांना यंदा महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं कडवं आवाहन असणार आहे. मागच्या निवडणुकीत त्यांनी अर्चना पाटील यांचे पती भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. यावेळी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी अजित दादांकडून तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप जोरदार होतांना दिसत आहेत. अशातच आता ओमराजे निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार घणाघात चढवला आहे.
हेही वाचा…राणाजगजितसिंह पाटलांनी घेतली जरांगे पाटलांची भेट, धाराशिवमध्ये राजकीय गणितं बदलणार ?
अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुखा सुखी भाजपसोबत गेलेले नाहीत. तर दोघांवर दबाव आणून भाजपने आपल्या बाजूने केले आहेत. तुरूंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनणं सोपं आहे. असा विचार करून दोघे भाजपसोबत गेल्याचा आरोप धाराशिव महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. ते एका सभेत बोलत होते.
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंच्या रक्तामध्ये शरद पवारांचा डीएनए, नणंदची जागा घेणार नाही”, शर्मिला पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्याच्या सहा दिवसातच अजित पवार भाजपसोबत गेलेच नाही. तर भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री ही बनवलं. तसेच अर्थ खातंही दिलं. कारण खायचं कसं ? हे त्यांना चांगलं माहित होतं असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच जनतेला भाजपची ही वॉशिंग मशीन पेटलेली नाही, जनता हिशोब करेल असाही टोला त्यांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी… ! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात, मोठी माहिती समोर
हेही वाचा….राहुल गांधींच्या सभेअगोदरच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक