मुंबई : राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं. तर २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकासाठीही काल मतदान झालं असून त्या सर्व निवडणुकांची आज मतमोजणी सुरू असून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात नंबर एकच्या स्थानासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे.
सुरूवातीपासून ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये अजित पवार गट नंबर एक क्रमांकावर होता. परंतु त्यानंतर भाजपने त्यावर सरशी करत एक नंबर पटकवलं आहे. यातच बारामतीत लागलेल्या निकालामध्ये १२ ग्रामपंचायतीमध्ये सर्व १२ ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने सत्ता स्थापन केली असून काकाला पुतण्याने जोरदार धक्का दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील अजित पवारांचा काका शरद पवारांना धक्का दिला आहे. कोल्हापुरात अजित पवार गटाकडे १४ ग्रामपंचायती तर शरद पवार गटाकडे एकही ग्रामपंचायत मिळाली नाही.यातच पुण्यातील रांजणगावावर अजित पवार गटाचं वचर्स्व दिसून येत आहे.यातच आतापर्यंत ५२५ ग्रामपंचायती निकालामध्ये अजित पवार गटाला १०२ तर शरद पवार गटाला फक्क ३७ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.