मुंबई : ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली याचिका शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावत मोठा निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील १६ आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. तसेच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा मोठा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यावरून आता राज्यातून खोचक प्रतिक्रिया समोर येत आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना कोर्टात जावं लागेल. निकालात विधीमंडळ पक्षाला अधिक महत्व देण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता कोर्टातच न्याय मिळू शकतं. अशी मोठी प्रतिक्रिया शरद पवार यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालावर दिली आहे. यावेळी शरद पवारांनी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात मोठ्या त्रुटी दाखवल्या आहेत.
दरम्यान, हा निर्णय उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना या निकालाची कल्पना होती. तसाच हा निकाल लागला आहे. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना सोपवली होती. हा न्यायालयीन निवाडा नाही तर राजकीय निवाडा आहे. व्हीपची निवड ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. शिवसेना नेमकी कुणाची ? हा निकाल अध्यक्षांनी दिला. परंतु जनता यावर मोठा निकाल देणार असेही शरद पवारांनी म्हटले आहे.