मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिलं आहे. मात्र शिवसेनेने मात्र बिस्कीट या चिन्हावर नापसंती दर्शवली आहे. बिहारमधील सत्ताधारी नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर काही दिवसांपूर्वी आक्षेप घेतला होता. बाण हे जेडीयू पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे.
त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाणाशिवाय उतरावं लागणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाला शिवसेनेने तीन पर्याय दिले होते. ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन पर्यायांपैकी एका चिन्हाची मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली होती.
पण यापैकी कोणतंच चिन्ह न मिळाल्याने शिवसेनेने निवडणूक आयोगाने दिलेल्या बिस्कीट या चिन्हाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवणारे पत्र लिहिलंय.
बिहारमध्ये रंगणार घमासान
कोराना काळात देशातली पहिली निवडणुक होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. या निवडणुकीत जनता दल आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे.
बिहार विधानसभेत एकूण 243 मतदारसंघ आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत सीपीएम-4, सीपीआय-6, सीपीआय(माले) -19, काँग्रेस-70 आणि राजद – 144 जागांवर लढणार आहे. 2015 च्या विधानसभा निडवणुकीत राजद-101, जेडीयू – 101 व काँग्रेस 41 जागांवर निवडणूक लढली होती. या निकालानंतर बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं.
महाआघाडीचा घटक पक्ष जेडीयू भाजपसोबत गेला. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू मुख्य चेहरा आहे. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवली जाईल.
Read Also :
अनेक भारतीय लोकं दलित, मुस्लिम, आदिवासींना माणूस समजत नाहीत, राहुल गांधींची खंत https://t.co/6ghhGLXcv9 @RahulGandhi @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 11, 2020