करोनाचा संसर्ग आणि उपचारांदरम्यान वेळेत अँम्ब्युलन्स उपलब्ध होऊ न शकल्याने पुण्यात पत्रकार पाडुंरंग रायकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुण्याचे पालक मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी या सर्व प्रकाराबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानी माध्यमांशी बोलणे टाळले. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी सरकार आणि आरोग्य विभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भाजप आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारला धारेवर धरत आरोग्य विभागाची सुविधांबाबत दुर्लक्ष होत असल्याची माहिती दिली तर पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना भाजपकडून पाच लाखांची मदत करणार असल्याची देखील चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली.
पांडुरंग यांच्या बहिणीने आपल्या भावाच्या मृत्यूला शासनालाच जबाबदार धरले आहे. प्रतिक्रया देताना म्हणाल्या, “सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आहेत. या ठिकाणी अनागोंदी कारभार सुरु असून प्रशिक्षित डॉक्टर्स नाहीत. सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून कोविड सेंटर उभारले. मात्र, ते कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध करु शकले नाहीत. त्यामुळेच माझ्या भावाचा मृत्यू झाला.”
Pune: Journalist Pandurang Raykar, who tested COVID19 positive, dies; family alleges lack of care at govt COVID centre
"There's chaos, doctors aren't trained. They made centres worth crores but couldn't arrange cardiac ambulance to shift him, that's why he died," says his sister pic.twitter.com/LAHhBfC1Sm
— ANI (@ANI) September 2, 2020