मुंबई – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचनालयानं नवे समन्स बजावले आहेत. येत्या 5 जानेवारीला मुंबईतील ED कार्यालयात हजर राहावे, असे निर्देश वर्षा राऊत यांना देण्यात आले आहेत. त्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून शिवसेनेनं भाजपवर आज पुन्हा टीकेची तोफ डागली. शिवसेनेनं भाजप नेत्यांवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. भारतीय राज्य घटनेचे भाजप कसं उल्लंघन करतं आहे आणि स्वत: च नवीन घटना तयार करून आगपाडख करत असल्याची टीका करण्यात आली आहे. आता त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता समाचार घेतला आहे.
‘प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!’, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे.
प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय?
गाव का गोळा करावा लागतोय?
ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय,तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत.
चला हवा येऊ द्या!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 30, 2020