मुंबई : राज्यात सध्या अनेक ठिकाण परतीच्या पावासने थैमान घातलं असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट असं म्हणत त्यांनी उपहासात्मक ट्विट केलं आहे. नगराचे राजे ‘बॉलिवूड’ कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेत अशी टीका त्यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट. महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात करोनासोबत पावसाने थैमान घातलेले…शेती, घरे, गुरे, सारे काही उद्ध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर. तेव्हा नगराचे राजे “बॉलिवूड” कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले”.
आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट..
महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोना सोबत पावसाने थैमान घातलेले…शेती, घरे, गुरे, सारे काही उध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर..
तेव्हा नगराचे राजे "बॉलिवूड" कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले!
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2020
“मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय. त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना पब, बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून नाईटलाईफची काळजी राजपुत्र करत आहेत. दुर्दैवी चित्र..महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा!,” असंही ते म्हणाले आहेत.
मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय..
त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना..
पब,बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून"नाईटलाईफची"काळजी "राजपुत्र" करीत आहेत..दुर्दैवी चित्र..
"महाराष्ट्र" नगरी आणि चौपट राजा!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 16, 2020
Read Also
ठाकरे सरकार कोसळणार ? राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिला 'हा' मोठा निर्णय https://t.co/j0tbnqfjTr#MahavikasAaghadi #MVA #Thackaresarkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020