मुंबई : देशात गेल्या २४ तासात करोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्ण आढळले असून, करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात देखील परिस्थती हाताबाहेर गेली असून, काल महाराष्ट्रात ६७ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे, ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात करोना बाधित रुग्णांसाठी बेड्स, ऑक्सिजन, रेमेडीसीवर इंजेक्शन्स या आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून, याची उपलब्धता वाढवण्याच्या प्रयत्नात आरोग्य सुविधांवर प्रचंड भर येत आहे. परिणामी राज्यात आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसीय संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, हे अभूतपूर्व आणि जवळजवळ युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आहे. सगळीकडे अत्यंत गोंधळ आणि तणाव आहे. बेड्स, ऑक्सिजन आणि लस देखील भेटत नाहीये. हा सर्व केवळ गोंधळ आहे. या बिकट परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन दिवसीय संसदीय अधिवेशन बोलवावे.
It's an unprecedented & almost a war like situation. Utmost confusion & tension everywhere!
No beds,no oxygen & no vaccination as well ! It's nothing but TOTAL CHAOS !
A Spl session of the Parliament for atleast 2 days should be called to discuss the situation!
जय हिंद! pic.twitter.com/c5rWbhyTD0— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2021
दरम्यान, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना टोला लगावत, शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे, तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून, त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे, तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. यावेळी सरकारने सर्व पारदर्शक परिस्थिती जनतेसमोर मांडावी, यासाठी तातडीने विधानसभा सत्राचे आयोजन करून सर्व आमदारांच्या समोर राज्यसरकारने सत्य परिस्थिती मांडावी, अशी मी मागणी करतो. pic.twitter.com/TYlf6SUC10
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 19, 2021
दुसरीकडे महाराष्ट्रासह देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. करोनारुग्ण संख्या प्रचंड वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन मागवण्यात आला आहे. त्यासाठी विशेष ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार असून यामधून राज्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार आहे.