नवी दिल्ली : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची देखील हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधानांची भेट घेता यावी यासाठी खासदार संभाजीराजे यांनी पत्र लिहून वेळ मागितली होती. मात्र अद्याप संभाजीराजेंना मोदींनी भेटीसाठी वेळ दिलेली नाही.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली 20 पेक्षा जास्त पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींकडून भेटीची वेळ मागितली आहे. मात्र अद्याप मोदींनी खासदारांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ दिलेली नाही.
मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार गंभीर दिसत नसल्याची टीका केली जात आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या अॅटॉर्नी जनरलबाबतचा निर्णय़ सरकारने घेतला पाहिजे. अॅटॉर्नी जनरलचा निर्णय आणि सरकारचा निर्णय हा एक असला पाहिजे. कारण अॅटॉर्नी जनरल ह सरकारचा माणूस आहे, असे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोंबरला महाराष्टर बंदची घोषणा करण्यात आली असून, गोलमेज परिषदेत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.