मुंबई : मीरा भाईंदर येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय मुलीवर सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यावरून आता भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात ३ पक्षांचे ३ मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार ही परिस्थिती असल्याचे, चित्रा वाघ म्हणाल्या.
राज्यात भगिनींनी किती संताप,शोक व्यक्त करत बसायचयं आणि डोळ्यांसमोर महिला मुलींना उध्वस्त होतांना पहायचं.
SOP ची मागणी गेली४महिने सातत्याने सरकारकडे करतोय.
इतर घटनेत तत्परता दाखवणारं सरकार महिलांवर होणार्या अत्याचारावर उदासीन का
माँ जिजाऊ,सावूमाई,रमाई,भिमाई फक्त भाषणांपुरतचं २/२— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 13, 2020
चित्रा वाघ यांनी ट्विट केले की, हे लिहीत असतांना आग मस्तकात जातीये पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये २० वर्षीय मुलीवर मिराभाईंदरला तिथल्या सुरक्षारक्षकांकडून बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली.राज्यात ३ पक्षांचे ३ मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार ही परिस्थिती आहे.
राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय आणि डोळ्यांसमोर महिला, मुलींना उद्ध्वस्त होताना पाहायचं. SOP ची मागणी गेली 4 महिने सातत्याने सरकारकडे करतोय. इतर घटनेत तत्परता दाखवणारं सरकार महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर उदासीन का? माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.