मुंबई : राज्यात दिवसोंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विरोधकांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. यातच भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, अशा सूचक शब्दांत शेलार यांनी निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, मुंबई, ठाणे, पुणे शहरातील बिल्डरांसाठी राज्य शासन प्रिमीयम कमी करण्याचा घाट घालत आहे. त्यासाठी पारेख कमिटी गठीत करण्यात आली आहे. पण, प्रिमीयम कमी केल्याने महापालिकांचे उत्पन्न घटणार त्याचे काय? सर्वसामान्यांसाठी घराच्या किंमती कमी होणार का?त्या किती कमी होणार?
रेडिरेकनरची फाईल जशी पुणे-मुंबई प्रवासात “लक्ष्मी दर्शन” करीत आली तशीच ही फाईल मंत्रालयातून कुठल्या कुठल्या “बंगल्यावर लक्ष्मीदर्शन” करीत फिरतेय? शेतकरी, श्रमिकांच्या प्रश्नांपेक्षा बिल्डरांच्या विषयात सरकारला अधिक रस का? राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर? अशा सूचक शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.