कोरोनाने त्रस्त असलेले मुंबईकर पावसामुळेहि बेजार झाले आहे. मागील काही दिवसापासून मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. हि बाबा लक्षात घेता भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘नालेसफाईचा दावा ११३% चा केला. आता नगरसेवक निधीवर ७३% डल्ला मारला. मुंबईकरांना काय मिळालं? गोरगरिबांच्या घरात पाणी शिरलेच. मुंबईची तुंबई झालीच. रस्त्यांवर खड्डे पडलेच. मग हे टक्के कुठे गेले? मुंबईकर कोविडशी लढत असताना, पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीचे घोडे चौखूर उधळत आहेत,” अशी टीका शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही शेलारांनी तोफ डागली आहे ते म्हणाले, “महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट. शिवसेनेच्या नगरसेवकांना ५३५.९५ कोटींचा निधी. वा!
मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची “प्रिपेड” समाजसेवा जोरात! इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत!,” असा गंभीर आरोपही शेलार यांनी शिवसेनेवर केला आहे.
मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची “प्रिपेड” समाजसेवा जोरात! इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत!,” असा गंभीर आरोपही शेलार यांनी शिवसेनेवर केला आहे.