मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी सामनाच्या अग्रलेखावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार म्हणाले की बांग्लादेशाचा जीडीपी भारताच्या ११ टक्के आहे, ‘सामना’मध्ये भारताची तूलना बांग्लादेशाशी करण्यात आली आहे. हे चुकिचं आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यावर काल टीका केली होती. यावर शेलार म्हणाले की दानवे यांनी हे सरकारला येड्या गबाळ्याचे सरकार म्हटलं आहे. पण हे सरकार येड्या गबाळा आणि बदमाषांचं सरकार आहे.
“सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या संपादकांचे लेख हे अभ्यासावर असतात. पण ‘सामना’चे अग्रलेख हे व्हॅाटस्अॅप युनिव्हर्सिटीच्या आधारे असतात,असे सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता ‘सामना’च्या अग्रलेखांवर टीका केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत “माझं कुटुंब माझी जबाबदारी” हि कसली जबाबदारी आहे, असा सवाल विचारला. एकट्या मुख्यमंत्र्यांनाच बाहेर पडले तर कोरोना होतो का? माजी मुख्यमंत्री किती जिल्ह्यात फिरले आणि आजी मुख्यमंत्री किती जिल्ह्यात फिरले, ते जनतेला माहिती आहे. नसेल माहिती तर आता जनतेला माहिती होईल, अशी टीका काल केली आहे.
मराठा आरक्षणासारखा विषयावर सरकारचे एकमत नाही. त्यावर एकत्र बसा चर्चा करावी, असं सरकारला वाटत नाही. सारी जबाबदारी अशोक चव्हाणांवर टाकून हे सरकार मोकळे झाले आहे. कोणाचा कोणाला मेळ नाही. “सरकार चालवणं येड्या गबाळ्याचे काम नाही. त्याला काम करणाराच माणूस लागतो,” अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर तोफ डागली होती.
मी स्वत: राज्याच्या अनेक ठिकाणी जाऊन आलो. जनतेची कामे केली. तरी पण मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले नाहीत, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली. आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना सर्व मदत केली. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर देखील जायला तयार नाही. या राज्याची अवस्था `अमर, अकबर, अँथनी` सारखी झालीय, अशी टीका मी केली तर माझ्यावर सारे तुटून पडले. पण या तीन पक्षांच्या तिघांची तोंडे तीन दिशांना आहेत.
Read Also
…आणि देवेंद्र फडणवीस गेले चिखल तुडवत,दौंड येथील शेतकऱ्यांशी साधला संवादhttps://t.co/VNylDtTnL4#DevendraFadanvis #BJP #PravinDarekar @Dev_Fadnavis @mipravindarekar @BJP4Maharashtra @bjp4mumbai @BJP4PuneCity
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 19, 2020