मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जपल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न खासदार असलेल्या दोनीही राजेंनी केंद्र सरकारकडून सोडवून घ्यावा असे म्हंटले होते मात्र त्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी भाजप समर्थ आहे असे म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.
“भाजपच्या मदतीने खासदार झालेल्या दोन्ही छत्रपतींनी भाजपच्या केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं शरद पवार म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत भाजपा कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही,” असं भातखळकर म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट करून आपली त्यांच्यावर निशाणा साधला
भाजपच्या मदतीने खासदार झालेल्या दोन्ही छत्रपतींनी भाजपच्या केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा_ शरद पवार
मराठा आरक्षणा बाबत भाजपा कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही.@abpmajhatv pic.twitter.com/wicVA8kwqs— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 30, 2020
काय म्हणाले होते शरद पवार नेमकं
खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनीही राजेंना लगावल्याचे पहायला मिळाले होते.