मुंबई : एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना अमरावतीमधील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. गुरुवारी ही शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता भाजपाने यशोमती ठाकूर यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं असं म्हणत महिला व बालविकास मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटवरुन ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. “गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी यशोमती ठाकूर यांना टॅगही केलं आहे.
गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री @AdvYashomatiINC यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल ?
गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री @AdvYashomatiINC यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण 'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 16, 2020
Read Also
25 वर्षांपासून महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता मग भाजपा दोषी कसे काय ?https://t.co/6kUqDog3HQ#MurlidharMohol #BJP @mohol_murlidhar @BJP4PuneCity
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020